Monday, 3 September 2012

आठवणीतली दिवाळी पहाट





आज सकाळी मी ऑफिस ला यायला कॅब मध्ये बसले आणि radio वर असच कोणतेतरी गाणे लागले होते..ते ऐकून मला एकदम एका दिवाळी पहाट ची आठवण आली. ७-८ वर्षानापुर्वीची दिवाळी पहाट. मी आणि माझी आजी एका दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाला गेलो होतो. खूप छान कार्यक्रम चालू होता. एक सुंदर गाणे माझ्या कानावर आले आणि मी कुठेतरी हरवून गेले. आणि त्यात एक sms आला .. "खूप दिवसापासून काहीतरी पेंडिंग होते ते मला आज मिळाले...तुला एक छानसे surprise दिवाळीनिमित्त. Guess who " मला काही कळेच ना कि हे कोण आहे आणि असा sms मला का केला असेल. तोपर्यंत इकडे ते छानसे गाणे पण संपले होते आणि टाळ्यांचा आवाज चालू होता. आजी एकदम म्हणाली "छान म्हटले ना गाणे " मी नुसतीच मान डोलावली आणि पुन्हा त्या sms चा  विचार करायला लागले...मग शेवटी ठरवले कि आता phone च करायचा. आणि तडक phone लावला. मी hello म्हणण्या आधी तिकडून कोणीतरी बोलले.."शुभ दिवाळी कसे वाटले surprise ? पहिला sms तुलाच केला अगदी ठरल्याप्रमाणे. तू म्हणाली होती ना कि जेव्हा तू पहिला mobile घेशील तेव्हा पहिला sms मला कर; मी लगेच ओळखेन कि हा तुझा नवीन mobile आहे " आणि मग तो आवाज ऐकून इतका बरे वाटले आणि खूप मनापासून आनंद झाला. खरच ती दिवाळी पहाट माझ्या कायम आठवणीतली ठरली..
खरच आपल्या आयुष्यात कोण कधी कसे येईल याचा थांगपत्ताच लागत नाही..आणि एक दिवस अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपले आयुष्य पालटून टाकते. 

Blog म्हणजे काय?


आज काळ सगळे उठून Blog लिहायला लागले आहेत. हा Blog म्हणजे नक्की आहे तरी काय? माझी अशी समजूत आहे कि blog म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या मनात चाललेले आणि दुसर्यांना उघडपणे न सांगता येणारे सगळे काही आपण यात लिहू शकतो..कारण त्यात कोणी नावांचा वापर करत नाही. पण तरी सगळे लिहिले जाते. मग तो Blog  कधी एखाद्या माणसावर असतो तर कधी एखाद्या प्रसंगावर, तर कधी एखाद्या प्राण्यावर तर कधी खाण्यावर तर कधी general म्हणजे एखादा घरातला, ओफिसिमाध्ला विषयावर...
मग मीही ठरवले कि बघू आपल्याला एखादा Blog लिहिता येतो का? पण मग प्रश्न पडला कि काय लिहू blog मध्ये. माझ्यापुढे तर असा काही विषय येत नाही ज्यावर मी काही लिहू शकेन..