खूप दिवसांपासून मनात एक गोष्ट राहून जाते आहे. कोणाशी बोलावे तेच कळत नाही. पण आज मात्र असे वाटले कि आपण कुठेतरी हे share करावे. माझ्या दिसण्यात अशी काही लोक आहेत जी अशी काही विचित्र वागतात कि त्यांच्याशी कोणी नाते जपतील तर नवलच!!!!
एखाद्याने कोणाच्या तरी मनाशी खेळ करणे हि खूप वाईट गोष्ट आहे . त्याचा त्या माणसाला खूप त्रास होतो. आता मनाशी खेळ म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? सांगते... असे कि एकाद्याने खूप समजावून सांगून सुद्धा समोरचा माणूस स्वतःच्याच मनासारखे वागत राहिला तर समोरची व्यक्ती काही दिवसाने सांगणे सोडून देईन.
किंवा असे कि हे चूक आहे असे एकाद्याला जीव तोडून सांगणे आणि तरी सुद्धा समोरचा चुकीचाच वा गत राहिला तर किती चिडचिड होईल हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. किंवा असे कि एखादा माणूस चुकला आणि ती चूक जर माफ करून सुधारण्याची संधी दिली आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर याचा अर्थ असा होऊ शकतो कि त्या माणसाला त्या चुकीचा कोणताही पश्चाताप झालेला नाही. आणि आपण मात्र प्रत्येक वेळेस समजून घेऊन, समजावून सांगतो आणि ती व्यक्ती आपल्या आपल्या मनाने वागायला मोकळी असते.
मला तर असे वाटते कि खरे तर असे काही न ठरवता सुद्धा त्या व्यक्ती कडून काही लोकांना खूप त्रास सहन करा वा लागतो. आणि मुख्य म्हणजे ती माणसे त्या व्यक्तीच्या सगळ्यात जवळची असतात. आणि मग हळूहळू त्या व्यक्तीचा स्वभावच असा बनतो कि त्याला सहानुभूती मिळाली कि ती व्यक्ती त्या माणसाला खूप त्रास देते. आणि मग इतका त्रास सहनशक्ती च्या पलीकडे जातो कि ती व्यक्ती त्या व्यक्तीपासून दूर जाते.
असे का होते ह्याचा मी खूप विचार करते पण मला अजून त्याचे उत्तर मिळाले नाही. का वागत असेल ती व्यक्ती अशी भरकटल्या सारखी ??? ती व्यक्ती काय मिळवत असेल असा त्रास देऊन आणि तो पण आपल्या सगळ्यात जवळच्या माणसाना??
आपण एखाद्या माणसात किती अडकावे हे आपले आपणच ठरवावे आणि ते सुद्धा वेळेत. कारण उशीर झाला तर मग त्याचा त्रास हि होऊ शकतो. एकदा तुमची attachment वाढली कि मग तुम्हाला त्यातून काढता पाय घेणे जमले पाहिजे......जे मला स्वतःला अजिबात जमत नाही. त्यामुळे मला वर मांडलेल्या सगळ्या गोष्टींचा त्रास झालेला आहे. म्हणजे कसे आहे ना कि जर तुम्ही पटकन switch off आणि on होणे जमत असेल तर छान नाहीतर त्याचा त्रास जास्त होतो. काही माणसे मी अशी पहिली आहेत जी या गोष्टींचा फार विचार करतच नाहीत. ते म्हणतात "कोणाला वेळ आहे या अश्या गोष्टींचा विचार करायला" "या कानाने ऐका आणि त्या कानाने सोडून द्या" हाच जगाचा नियम आहे. मला हि लोक म्हणतात कि तू खूप emotional आहे. उगीच कशात तरी अडकते.
पण आता मला याची उत्तरे शोधायची आहेत. तुम्ही साथ देणार?